Share

“काही जणांना फक्त अधिकार कळतात, कर्तव्ये…”, अतुल भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मशिदींमध्ये भोंगे वापरणे हा मूलभूत अधिकार नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. उत्तर प्रदेशमधील बदाऊन जिल्ह्यातील इरफान यांनी केलेली याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने हे मत मांडले. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

“मशिदीवरील भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका अर्थी हा देश फक्त आणि फक्त संविधानानुसारच चालेल हे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले. या देशात काही जणांना फक्त अधिकार कळतात, कर्तव्ये नाहीत.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान मे २०२० मध्ये उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकांवर निर्णय देताना नमूद केले होते, की अजान  हा इस्लाम धर्मातील अविभाज्य भाग आहे. परंतु प्रार्थना म्हणताना भोंग्याचा वापर करणे ही धार्मिक अनिवार्य बाब होऊ शकत नाही.  दरम्यान योगी सरकारने यूपीतील ५० हजार भोंगे हटवले असून ६० हजार ठिकाणांवरील आवाजावर मर्यादा आणली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!