🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.
माजी पंतप्रधान, सहृद्यी राजकारणी, सर्वोत्तम संसदपटू भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/B56uGL2xLW
— Supriya Sule (@supriya_sule) August 16, 2018
माजी पंतप्रधान, सहृद्यी राजकारणी, सर्वोत्तम संसदपटू भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला अश्या शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे.
देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.


