🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने मोहाली कसोटीमधील रवींद्र जडेजाच्या जबरदस्त अष्टपैलू प्रदर्शनाबद्दल आनंद झाल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला की जडेजाने या पुढेही अशीच गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये करावी.
अश्विन म्हणाला मला वाटते की, “हा पहिला आणि शेवटचा नसणार आहे. माझ्या मतानुसार जडेजा येणाऱ्या काळात खूप काही हासील करेल. मला मनापासून वाटते की त्याने खूप मोठे व्हावे आणि सर्व काही त्याला मिळो.”
रवींद्र जडेजाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने मोहाली कसोटी सामन्यात १७५ धावा आणि ९ विकेट्स घेऊन एक मोठा कारनामा केला आहे. जगात बोटाव मोजण्याएवढेच असे खेळाडू आहेत. त्याने मोहाली कसोटीत नाबाद १७५ धावा आणि ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या अष्टपैलू खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
