इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ऑगस्ट रोजी नॉटिंघममध्ये सुरू झाला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बरीच चर्चा झाली आणि जेव्हा त्याची घोषणा झाली तेव्हा अनेक दिग्गजांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. टीम इंडियात रवीचंद्रन अश्विनच्या जागी रविंद्र जडेजाला संधी मिळाली. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला पहिल्या सामन्यात संधी न दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला.
त्यानंतर अनेकांनी विराटच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत टीका केली. सर्वत्र विराटवर टीका होत झाली. अश्विनला केवळ पहिली टेस्ट नाही तर संपूर्ण साीरिजमध्ये संधी मिळणार नाही, असं सूचक वक्तव्य टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं केलं आहे. कोहलीनं पहिल्या टेस्टमध्ये निवडलेली टीम ही या सीरिजमध्ये आमची योग्य टीम आहे, असं वक्तव्य विराटनं केलं आहे.
विराटच्या या निर्णयावर भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी नाराजी व्यक्त करत म्हणाले होते की, ‘मी नेहमीच विश्वास ठेवतो की रविचंद्रन अश्विन हा एक अतिशय प्रतिभावान गोलंदाज आहे. अलिकडच्या परदेश दौऱ्यात त्याने केलेली कामगिरी आश्चर्यकारक आहे. जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच हरवले. या मालिकेत टीम इंडियासमोर त्याचा आत्मविश्वास दिसून येतो. पुढे ते म्हणाले, अश्विनसाठी मला अजूनही वाईट वाटते. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, तुम्ही त्याला प्लेइंग इलेव्हनपासून दूर ठेवू शकत नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी; मनसेच्या ‘या’ प्रश्नांची उत्तरं सरकार देणार काय ?
- सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते ?
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- ‘मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत,तर राज्यातील भाजपनेते मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
