Share

Ashok Chavan | “…आता खातेवाटपासाठी ४० दिवस घालवणार का?”- अशोक चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ३८ दिवसांनंतर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र खाते वाटप अजूनही झालेले नाही त्यावरूनच आज काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. “राज्यात एवढी बिकट परिस्थिती असूनही मंत्रिमंडळ विस्तारासाठी ४० दिवस लावले आता खाते वाटपासाठीही ४० दिवस घालवणार का? असा प्रश्न पडला आहे. यामुळेच सरकारचं कामकाजही ठप्प झालेलं आहे.”, असं चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.

तसेच अंबादास दानवेंच्या निवडीवरून नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, “महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्रित आहोत. आमच्यातील एकोपा राहायला हवा हीच आमची अपेक्षा आहे. परंतु कोणतेही महत्वाचे निर्णय घेत असताना काँग्रेसला विश्वासात घेतलं जावं. निर्णय हे समन्वयाने व्हावे, एवढीच आमची किमान अपेक्षा आहे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!