Share

सरकार बदल्या, टेंडर वाटपात गुंग! आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर बोचरी टीका

Published On: 

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाच्या हंगामाला सुरुवात झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबई, पुण्यासह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे.

दरम्यान, कालपासून जोर धरलेल्या पावसामुळे पुन्हा मुंबईची तुंबई झाल्याचे दिसून आले आहे. प्रमुख रस्त्यांसह वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरले असून पालकमंत्री अस्लम शेख यांनी १०० टक्क्यांहुन अधिक यशस्वी नालेसफाईचा दावा देखील याच पाण्यात वाहून गेलेला यावर्षी दिसून आले. तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले असून हाती येणार उभं पीक वाहून गेलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन, निर्यात बंदी अशा संकटांना सामना कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिकूल स्थितीमध्ये भर पडत असून सरकार दरबारी याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजप नेत्यांनी मुंबई महापालिकेसह राज्य सरकारवर या मुद्द्यावरून वेळोवेळी निशाणा साधण्यात आला आहे. आता पुन्हा पावसाच्या रौद्ररूपामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईतील स्थितीवरून भाजपचे नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

” विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!” असे ट्विट करत आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!