मुंबई: पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घेतलेल्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी आता ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. मविआ सरकारच्या कृतीवर मा सर्वोच्च न्यायालयाने जोरदार थप्पड लगावली आहे. तसे तर संसदीय कामात न्यायालयीन हस्तक्षेप नसतो. पण जेव्हा लोकशाहीची पायमल्ली होते, तेव्हा संविधानाचे रक्षण न्यायालयालाच करावे लागते. आता सरकारने या १२ मतदारसंघातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
ठाकरे सरकारने अहंकारामुळे शहाणपण गमावलेय! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/UdxgiuIbMt
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 28, 2022
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील ठाकरे सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. आशिष शेलार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. तसेच देशातील लोकशाहीला अंजन घालणारा हा निर्णय असल्याचे शेलार म्हणाले. पुढे ठाकरे सरकारवर टीका करताना शेलार म्हणाले, शहाण्याला शब्दांचा अर्थ कळतो, मात्र ठाकरे सरकारने अहंकारमुळे शहाणपण गमावले आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय क्रिकेटला कणा नसेल”; रवी शास्त्रींचा गांगुलीला टोला
वाईन विक्रीला वाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल- विनायक राऊत
“…हा सत्याचा विजय”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर जे.पी.नड्डा यांची प्रतिक्रिया
“तीन चाकी सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं”, आ. कीर्तीकुमार भांगडिया
भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर संजय राऊत म्हणाले…


