🕒 1 min read
पुणे : शरद पवार म्हणतात नवाब मालिकांवर कारवाई फक्त राजकीय हेतुने केली जात आहे. ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात आहे. माझ्यावरही तसे आरोप करण्यात आले होते. असे बोलत शरद पवारांनी नारायण राणेंना वेगळा न्याय आणि नवाब मालिकांना वेगळा न्याय का? असा प्रश्न करत सपष्ट भूमिका मांडली आहे.
शरद पवार म्हणतात, नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून तुम्ही मंत्रिमंडळातून काढा असे बोलत आहात. मान्य आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आले नव्हते. उद्या नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत कदाचित याचा खुलासा करतील असा टोला शरद पवार यांनी केला आहे.
पुढील ५ वर्षात निवडणुकात काय होईल? हे सांगायला मी काय ज्योतिष नाही. फोन टॅपिंग होतात मी पाहिलंय वरिष्ठ जे सांगतात ते अधिकारी करत असतात परंतु याची किंमत यांना चुकवावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
