मुंबई : बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री एकापेक्षा जास्त लग्न करतात. अनेक कलाकारांचे अफेयर्स हा बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा केला जाणारा विषय. बॉलीवूडमध्ये सध्या अर्जुन कपुर आणि मलायका आरोरा ही जोडी सध्या हॉट कपल म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
अर्जुन कपुरचे वडिल निर्माते दिग्दर्शक बोनी कपुर यांचेही श्रीदेवीसोबत प्रेमप्रकरण होते. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा अर्जुन कपुर आणि बोनी कपुर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. श्रीदेवीच्या निधनानंतर त्याने वडिलांना आधार दिला होता. मात्र तरिही त्याने श्रीदेवीसोबत असलेल्या नात्याला कधीच योग्य नाही म्हणाला. मात्र मलायकाच्या प्रेमात पडल्यानंतर त्याचा विचार बदलला आहे. तो म्हणाला की,’माझ्या वडिलांनी जे केलं ते त्यांच्यासाठी योग्य होतं पण माझ्यासाठी ते चूकीचंच होतं कारण मी त्यांचा मुलगा असल्याकारणाने माझ्यावर या सर्व गोष्टींचा खूप प्रभाव पडला होता मात्र आता मोठा झाल्यानंतर सुद्धा त्याच दृष्टीने मी या गोष्टींना पाहतोय. त्यामूळे हे खूप चांगलं समजू शकतो.’ असे म्हणाला.
अर्जून कपूरच्या आई आणि बोनी कपुर यांच्या पत्नी मोना शौरा याचं ९ वर्षांपूर्वीच निधन झालं. अर्जुन कपूरचे त्याच्या आई मोना शौरीसोबतचं नातं खूपच घट्ट होतं. पण वडीलांच्या आणि श्रीदेवीच्या अफेअरबद्दल कळाल्यानंतर दोघा बाप-लेकाच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर मोना आणि बोनी कपूर दोघे वेगळे झाले आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत लग्न केलं. मात्र आता श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुनने श्रीदेवीची मुलगी जान्हवीला बहीणीप्रमाणे वागणुक देत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- लुटेरी दुल्हन! सोनू शिंदे युवतीचा कारनामा, चक्क १३ लग्न करत १३ मुलांना लाखोंना गंडवले
- वडिलांच्या मृत्युला रुग्णालयच जबाबदार असल्याचा संभावना सेठने केला आरोप
- न्यूझीलंडचा ‘हा’ फलंदाज अश्विनला सामोरे जाण्याची अशी करतोय तयारी
- ‘माझा होशील ना’ मालिकेला रंजक वळण; सईला आदित्य देणार खास सरप्राईज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

