🕒 1 min read
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपण्याची चिन्हे आहेत. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये होणारी ही डे-नाईट कसोटी म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणीच ठरली आहे.
या कसोटीत फिरकीपटूंचा बोलबाला दिसून येत आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ११२ वर सर्वबाद झाल्यावर काल भारताने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताला एका मागे एक धक्के बसत गेले. १४५ धावांमध्ये भारताचा संघ बाद झाला. यानंतर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच षटकात अक्षर पटेलने दोन बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला.
यानंतर, आर. अश्विन च्या जोडीने अक्षरने इंग्लंडला सुरुंगच लावला. अवघ्या ८१ धावांवर इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळला. आता, भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून विजयासाठी केवळ ३८ धावांपासून भारत दूर आहे. सद्या, रोहित शर्मा व शुबमन गिल हे खेळत आहेत. ११ धावांवर शून्य बाद अशा स्थितीत भारतीय संघ आहे.
अक्षर पटेलची कमाल –
अक्षर पटेलने इंग्लंडच्या पहिल्या डावात ६ बळी घेत इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले होते. यानंतर, दुसऱ्या डावातही अक्षर पटेलच्या फिरकीची कमाल पाहायला मिळाली. पहिल्याच षटकात २ गडी शून्यावर बाद करून माघारी धाडल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव देखील कोसळला. या डावात अक्षराने ५ बळी पटकावले. त्यामुळे या कसोटीमध्ये तब्बल ११ बळी घेऊन त्याने जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मधील पहिल्याच सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …हे मोदी सरकारच्या चिवट झुंझीचं यश; नीरव मोदीच्या प्रत्यार्पणावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
- भीक नको पण कुत्रं आवर, गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला
- खरे वाघ असाल तर चित्रा वाघ यांच्यासारखे वागा, शेळ्या-मेंढ्यांसारखे नको; शेलारांचा शिवसेनेवर प्रहार
- १० दिवसांतच अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार ; ‘या’ दिवशी मांडणार अर्थसंकल्प
- महाराष्ट्रात आरोग्यावर हवे अधिकचे काम, ७५ टक्के आमदारांचे मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
