Share

‘अण्णांच्या आंदोलनावर बनवाबनवी होऊ नये’; बच्चू कडू यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली होती. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार असं चित्र निर्माण झालं होतं.

मात्र काल सरकारच्यावतीने केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आज जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनी जे आंदोलन स्थगित केलय त्याच्यावर बनवाबनवी होऊ नये, दिलेला शब्द भाजपने पाळावा, नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू हे सांगायला आलो, असे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. ते tv9 मराठीशी बोलत होते.

अण्णांना भेटल्यानंतर एक प्रकारे ऊर्जा मिळते म्हणून आलो होतो. 60 दिवस झाले तरी शेतकरी आंदोलन सुरू आहे. शांततेत चालू आहे. सरकार हट्टीपणा करतंय. कायदा ज्यांच्यासाठी आणला तेच जर आंदोलन करत असतील, तर ते मानलं पाहिजे. कायदा मागे घेतला तर सरकारचे फार मोठे नुकसान होणार नाही, असंही बच्चू कडू म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!