Share

‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’

Published On: 

मुंबई : चिपळूण या ठिकाणी महापुराने विळखा घातला आहे. कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्ये पुराचे पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या ८ रुग्णांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चिपळूणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. तर अशा वेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी मुंबईला पळ काढला. त्यामुळे भाजपच्या चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर सोशल माध्यमावर टीका केली आहे.

‘आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत. एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले. अशा वेळेस अनिल परब पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी रात्रीतून मुंबईला पळ काढतात. अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री’. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

२००५ नंतर पहिल्यांदाच चिपळूण येथे पावसाची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने कोकण पाण्याखाली गेले आहे.आतापर्यंत ७१ जणांचा पावसाने बळी घेतला आहे. तर दरड कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळेस पालकमंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्त ठिकाणाहून पळ काढल्याने त्यांच्यावर भाजपकडून टीका कली जात आहे. दरम्यान एनडीआरएफची २ पथके, आर्मीचे १ पथक, नौदलाची २ पथके, हवाईदलाचे २ पथके तसेच १५ स्वयंसेवी संस्थांमार्फत बोंटीद्वारे या ठिकाणी मदत कार्य सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!