Share

Anil Desai | “आठवणींबद्दलच बोलायचंय तर आमच्याकडे 2009 पूर्वीच्या…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल देसाईंची टीका

Published On: 

🕒 1 min read

Anil Desai | मुंबई : मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह (Amit Shah) यांच्यावर आधारित एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेनेने २०१४ मध्ये फक्त चार जागांसाठी युती तोडली आणि बेईमानी केली असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. फडणवीसांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी प्रत्युत्तर दिलंय.

ते म्हणाले, “जशा आठवणी फडणवीस यांच्याकडे आहेत, तशाच आमच्याकडेही आहेत. मात्र आम्ही त्याची वाच्यता करत नाही.” आमच्याकडे 2009 च्या आणि त्यापूर्वीच्याही आठवणी आहेत. मात्र आम्ही भाष्य करणार नाही, असं देसाई म्हणालेत. आज दिल्ली उच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात सुनावणी होती. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीवरही अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. काही दिवसांपूर्वी वेषांतर करुन बैठका केल्या. आता पुन्हा बैठक होत आहेत. गुप्त बैठका होत आहेत. यातून काय साध्य होणार हे पाहावं लागेल, असंही अनिल देसाई म्हणालेत.

नेमकं काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, “शिवसेनेने बेईमानी केली, पण अमित शाह (Amit Shah) यांच्या रणनीतीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली.” पुढे ते म्हणतात, “महाराष्ट्राच्या २०१४ च्या निवडणुकीत आपण शिवसेनेसह युती करण्यास तयार होतो. आपण कमी जागा लढण्यासही तयार होतो. पण केवळ चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!