औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असा दावा करण्यात आलाय. नवनिर्वाचीत अध्यक्ष नितीन पाटील यांनी नुकतेच शिवबंधन बांधल्याने हा दावा, खराही आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या निवड प्रक्रियेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित नेत्यांकडे पाहिले तर हा ‘शिवसेनेचा भगवा’ म्हणावा का? असा प्रश्न पडतो.
या पत्रकार परिषदेला डावीकडून उपस्थित नेत्यांमध्ये नवनिर्वाचीत अध्यक्ष नितीन पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्या बाजूला काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांची उपस्थिती होती. शिवसेना जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे, शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह नाव घेता येईल असा, जिल्ह्यातील शिवसेनेचा एकही नेता या ठिकाणी उपस्थित नव्हता. अशा सर्व परिस्थितीत जिल्हा बँकेवर शिवसेनेची सत्ता आली का? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत राहते.
जिल्हा बँक निवडणुकीचा निकालही अपेक्षेप्रमाणेच लागला. भ्रष्ट्राचाराच्या आरोपानंतरही जिल्हा बँकेची सत्ता कायम ठेवण्यात पाटील कुटुंबियांना यश आले. सुरेश पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा बँकेची जबाबदारी त्यांचे पुत्र नितीन पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेले काँग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील आधी भाजप आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झाले. त्याच वेळी पुन्हा अध्यक्षपदी नितीन पाटील यांची वर्णी लागेल याचे स्पष्ट संकेत मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद नाभिक महामंडळाचा विरोध
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- शहरातील सर्व वसाहतींचे निर्जंतुकीकरण करा! शहर परिवर्तन आघाडीचे आयुक्तांना साकडे
- या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील ; पंकजा मुंडेंचे मोठे विधान
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
