Share

महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात किती आकस आहे हे आज दिसलं – अमोल मिटकरी

Published On: 

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडं, भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पावर सविस्तर भाष्य करत समर्थन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याची टीका केली आहे. ‘महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारच्या मनात किती आकस आहे हे आजच्या अर्थसंकल्पातुन अख्या राज्याला दिसून आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्र सरकारचे थकलेले GST चे थकबाकी असलेल्या 35 हजार कोटीबाबत चकार शब्दही काढला नाही.’ असं टीकास्त्र मिटकरींनी सोडलं आहे.

अजित पवारांचे सर्वपक्षीय खासदारांना आवाहन !

‘आज केवळ अर्थसंकल्प मांडला गेला आहे. तो मंजूर होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवश्यक सुधारणा सूचवून महाराष्ट्रावरचा अन्याय दूर करावा, महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं माझं आवाहन आहे. मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे, ही तरतूद अर्थसंकल्पाच्या पानांवरुन प्रत्यक्षात उतरणंही तितकंच महत्वाचं आहे,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर सविस्तर भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!