Share

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची काँग्रेसच्या पथकाने पाहणी करावी, अमित देशमुखांच्या सूचना

Published On: 

🕒 1 min read

लातूर : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नदीकाठी वाढलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची लातूर जिल्हा काँग्रेस पथकाने पाहणी करावी. गावकरी, आपदग्रस्त यांना दिलासा द्यावा, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. आपदग्रस्त ग्रामस्थ शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा काँग्रेस पथकाने पुढाकार घ्यावा, नुकसानीची पाहणी करावी, झालेल्या नुकसानी संदर्भात प्रशासनाला माहिती कळवावी अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत.

काँग्रेस पक्षाकडून यासाठी प्रदेश सरचिटणीस आमदार धीरज देशमुख, अशोक पाटील निलंगेकर, राजेश्वरराव निटुरे, आणि अमर खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या वतीनेही त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, त्या कामी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे असेही त्यांनी म्हटले आहे .

राज्यातील महाविकास आघाडीचे शासन कोणत्याही प्रसंगात जनतेसोबत असून आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यास वचनबद्ध आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासन आणि जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडताना नदीकाठच्या गावांना पूर्वकल्पना द्यावी, शेतकऱ्यांना सावध करावे त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही नदीपात्रात जाऊ नये, आपली जनावरे शेती अवजारे सुरक्षित ठिकाणी न्यावीत, नदीला पूर आलेला असताना पुलावरुन पाणी वाहत असताना त्याठिकाणी पोहण्याचे किंवा वाहने नेण्याचे कोणीही धाडस करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!