पुणे : एकनाश शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. या सत्तासंघर्षानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून वाद खूप पेटले होते. काल याप्रकरणावर सर्वोच्य कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षावरील वर्चस्व ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. परंतू सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कडून निकाल लागला आणि ठाकरेंनी दाखल केलेली याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली.या प्रकरणावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे ?
आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने जो निकाल दिला. त्यावरून शिंदे गट आनंदी आहे. परंतू शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. खरं यश शिवसेनेला मिळेल, असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपेक्षाभंग झालेला नाही, आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी याठिकाणी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्या विचारांचीच खरी शिवसेना –
पुढे बोलतना ते असंही सांगितले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांची हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गटातील आमदार शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आले आहेत. त्यांना निवडणुकीसाठीचा अर्ज देखील उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच देण्यात आला होता.
तसेच, त्या बंडखोर 40 आमदारांनी गद्दारी केली. तर शिवसेना सोडून द्यायची होती. त्यांन मनसे, प्रहार किंवा भाजपात प्रवेश करायचा होता. मात्र दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचं नसेल, ते अपात्र ठरतील. मग, राज्यात निवडणुका जाहीर होती, यासाठी शिवसैनिकांनी तयार राहिलं पाहिजे, असंही दानवे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs AUS । अवार्ड घेऊन ग्राउंडवर लहान मुलासारखा धावला विराट कोहली, पहा मजेदार व्हिडिओ
- INC । मोठी बातमी : अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर असलेले गेहलोत शर्यतीतून आऊट..!
- Health Tips | रोज सकाळी रिकाम्या पोटी 2 अक्रोड खा, आणि या आजरांपासून सुटका मिळवा
- Eknath Shinde | नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविले जाणार – मुख्यमंत्री
- Nilesh Rane । निलेश राणेंची पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींवर टीका; म्हणाले …


