Share

लातुरात रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्युदर काही कमी होईना!

Published On: 

लातूर: जिल्ह्यात गेल्या महिन्यापेक्षा रुग्णांच्या संख्येत कमालीचा फरक दिसून येत आहे. चार अंकी असलेली रुग्णांची संख्या आता तीन अंकी झाली आहे. रुग्णांची संख्या कमी होत आहे मात्र मृत्यू दर कायम आहे. कोरोना रुग्णांची वाढत्या संख्येला काही प्रमाणात आळा बसत असला तरी महत्वाचं म्हणजे मृत्यूदर कमी होणं गरजेचं आहे. मंगळवारी ३९९ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून ३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी १०६९ रूग्ण कोरोनावर मात करून सुखरूप आपापल्या घरी गेले आहेत. ही चांगली बातमी असली तरी आता मृत्यू दर तसेच कोरोना बाधितांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. मंगळवारी आरटीपीसीआर टेस्टमधून १०७ तर रॅपिड अँटिजेन टेस्टमधून २९२ असे एकूण ३९९ रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. गेल्या महिन्यापेक्षा आता कोरोनाबाधीतांचा आकडा कमी येत आहे, मात्र अजूनही कोरोनाचे संकट गेले नाहीये.

मंगळवारी आरटीपीसीआर एकूण टेस्ट ५४९ तर रॅपिड अँटिजेन टेस्ट २५५७ झाल्या. एवढ्या टेस्टमधून ३९९ रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी ३१ रूग्ण कोरोना विषाणूची लागण होऊन दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत १८३३ रूग्ण कोरोनाने दगावले आहेत. एकूण कोरोना प्रभाव काळात जिल्ह्यात ८५ हजार ६८४ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असले तरी यातील उपचाराने ७८ हजार १०१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!