मुंबई : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यामधली कोंडी अद्याप कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना कृषी कायद्यां विरोधातील आंदोलनावर मौन सोडलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर देखील भाष्य केले आहे. मी सुधारणेसाठी तयार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. शरद पवार यांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला विरोध केला नाही असं मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आपली भूमिका बदलून युटर्न घेतल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला आहे. ‘शरद पवारांनी यू टर्न घेतला हा अनुमान कसा काढता? त्यांनी काय नाव घेतलं, भाजपचे काही खासदारही कायद्याला विरोध करत आहेत. अद्याप कुणी यू टर्न घेतला नाहीये. मोदींचा स्वतःच्या अस्तिवासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. कायदा येणार होता, छापलं होतं, असं काही नाही. लोक या कायद्याला काळा कायदा म्हणतायत,’ असं भाष्य आव्हाड यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ’
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- माता रमाई आंबेडकरांचे मुंबईत स्मारक उभारणार – रामदास आठवले
- ‘राणेंना शिवसेना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही’
- गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्रिपदी पाहायचे स्वप्न अधुरेच, धनंजय मुंडे भावुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

