Share

मराठा आरक्षणासाठी आक्रोश मोर्चाला बीडपासून सुरुवात

Published On: 

औरंगाबाद : न्या. गायकवाड आयोगाने सर्वेक्षण करून मराठा समाजाचा मागास प्रवर्गात समावेश केला होता. त्यानंतर राज्य सरकारने आरक्षणही लागू केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले. यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. गरीब, भूमिहीन, कष्टकरी, अल्पभूधारक मराठा विद्यार्थी व त्यांचे कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहेत.

त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा ५ जून रोजी बीड येथून मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

सारथी संस्था, फी प्रतिपूर्ती, जिल्हा वसतिगृह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आदी योजनांकडेही सरकार कानाडोळा करत आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ५ जून रोजी बीड येथून पहिला मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून त्यात औरंगाबादेतून शेकडो कार्यकर्ते सहभागी होतील, असा इशारा शिवसंग्रामचे शहराध्यक्ष उमाकांत माकणे, कार्याध्यक्ष सलीम पटेल, मराठवाडा विद्यार्थी अध्यक्ष सचिन मिसाळ पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भनगुरे, गुड्डू बिल्डर, महेश जोगदंड, उत्कर्ष चव्हाण, वरद जागेस आदींनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!