Share

Ajit Pawar | “तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा, पण…”, रामदास कदमांवर अजित पवार संतापले

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी एकमेकांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांवर टीका करत आहेत. या सगळ्या प्रकारावर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या टीकेवर अजित पवारांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं आहे.

तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा, पण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्राची परंपरा नाही.महाराष्ट्राला तशी शिकवण नाही. ज्यात राज्याचं नुकसान होतंय, बेरोजगारांच्या नोकऱ्या जातायत, अशा विषयांवर बोला. वैयक्तिक टीका-टिप्पणी कशाला करता? कुणी दाढी वाढवावी, कुणी दाढी काढावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण त्यावर बोलण्याचं काय कारण आहे?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

मागच्या काळात काही लोकांनी मोठ्या नेत्यांची चेष्टा केली होती. सोनिया गांधींचीही काहींनी चेष्टा केली होती. ते लोकांना आवडलं नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

तुम्ही तुमची भूमिका मांडा. सरकारचं काही चुकत असेल तर विरोधकांनी ते दाखवावं. विरोधकांचं काही चुकत असेल, तर ते सरकारनं दाखवावं. पण कुणाच्या लग्नाचं काय झालं, कुणाच्या दाढीचं काय झालं हे कशाला?” अशा शब्दांत अजित पवारांनी रामदार कदम यांना सुनावालं आहे.

दरम्यान, आंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ, मग बायको आल्यावर संसार कसा ते कळेल, नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते, म्हणजे खोके काय असतील ते कळेल, असं रामदास कदम म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!