पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राज्यात राजकारण चांगलेच तापत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, सुडाचं राजकारण कुठवर करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काहीजण पहाटे ट्विट करून माहिती कशी देऊ शकतात, यावरूनच तुम्ही समजून घ्या हे नेमकं काय सुरू आहे. तरीही अटक झाली, यावरून काय बोध घ्यायचा तो जनतेनं घ्यावा. नवाब मलिकांनी त्यांची बाजू या पूर्वीच मांडली, असंही पवारांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
…तर मग राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही?- चंद्रकांत पाटील
“…मला नेहरूंनी घेतलेल्या परराष्ट्र धोरणाची आठवण करून देते”, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट चर्चेत
८० वर्षीय धाडसी वृद्धाचे देशप्रेम! युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभा, फोटो व्हायरल
“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी…”, अनिल पाटलांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

