Share

“शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर राज्य चालत असून…”, अजित पवार यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन हा ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून काल (६ मे) साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कोल्हापूरच्या शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दूरभाष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिले.

यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर राज्य चालत असून प्रत्येक पिढीनं शाहू विचारांचा अंगिकार केला पाहिजे. शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला. शाहू महाराजांचं काम हे डोंगरा एवढं मोठं असून त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी होता. त्यांच्या सामाजिक न्याय विचारांवरच सामाजिक क्रांती घडली.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे काळजी घेणारे, आधुनिकतेचा स्विकार करणारे व दूरदृष्टी असलेले लोकराजा होते व त्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित ठेऊन विविध क्षेत्रात विकास घडवून आणला.’ तसेच कोल्हापुरात सारथी संस्थेसाठी जागा देण्यात आलेली असून त्याबाबतचा आराखडा पुढील पंधरा दिवसात पूर्ण होईल. कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकातील निधी ठेवण्याची आवश्यकता नाही तर, अशा स्मारकासाठी जेवढा आवश्यक निधी असेल तो सर्व निधी देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असून शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल, असेही पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!