Share

एअर इंडियाचे होणार खाजगीकरण, एअरलाईन्स चालवणे सरकारला शक्य नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने एअर इंडियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाला बाहेर काढण्यासाठी एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. एअर इंडिया चालवणे हे भारताला आता शक्य नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

याबाबत हरदीप पुरी म्हणाले की, एअर इंडिया बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे आता एअर इंडिया चालवण्याची आता सरकारची तयारी नाही. त्यामुळेच या एअरलाइन्सचे 100 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एअर इंडियाच्या खाजगाकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

दरम्यान एअर इंडियावरच्या कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. त्यामुळे सरकारला एअर इंडिया चालवणे अशक्य झाले आहे. तसेच आर्थिक संकट असल्याने एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या पगारही गेले अनेक दिवस थकले आहेत. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी केंद्र सरकारचे एक महिन्यात 300 कोटी रुपये खर्च होतात. त्यामुळे देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि एअर इंडियावर दिवसेंदिवस वाढणार कर्ज हे सरकारसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्या सारखं आहे. सध्या एअर इंडियाचं कर्ज 55 हजार कोटींवरून वाढत जाऊन 58 हजार 351 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झालं आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!