मुंबई : नव्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशाच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलने केली आहेत. केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ”अब होगी किसान की बात” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमावरून टोला लगावल्याचे दिसत आहे.
“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं, मोदी सरकारने उत्पन्न तर अनेक पटीने वाढवलं मात्र अदानी-अंबानीचं. जे काळ्या कृषी कायद्यास आतापर्यंत बरोबर म्हणत आहेत. ते काय शेतकऱ्यांच्या हितादृष्टीने तोडगा काढतील? अब होगी किसान की बात…”असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तर, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असे मागील चार दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले आहे.
वादा था किसानों की आय दुगनी करने का, मोदी सरकार ने आय तो कई गुना बढ़ा दी लेकिन अदानी-अंबानी की!
जो काले कृषि क़ानूनों को अब तक सही बता रहे हैं, वो क्या ख़ाक किसानों के पक्ष में हल निकालेंगे?
अब होगी #KisaanKiBaat
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 29, 2020
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !
- सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला : चंद्रकांत पाटील
- ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे
- ‘ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा!; दिल्लीमधील शेतकरी आंदोलनावरुन शिवसेनेचा भाजपला टोला
- ‘५० रुपयांचं रिचार्ज करुन फालतूचं ज्ञान देऊ नको’; दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून कपिलने एका नेटकाऱ्याला चांगलेच फटकारले


