🕒 1 min read
पंजाब : पंजाब राजकीय क्षेत्रात सध्या भूकंप आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असे म्हणत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला फोन करुन सॉरी म्हणाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलतांना सिंग म्हणाले की, ‘सोनिया गांधी यांनी मला सकाळी फोन केला परंतु मी तो उचलू शकलो नाही. त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला आणि हे सगळे काय चालले आहे. याबद्दल विचारणा केली आणि अशा परिस्थितीत मी राजीनामा देणे योग्य आहे, असेही त्यांना सांगितले. यावर त्या म्हणाल्या की ठीक आहे, द्या तुम्ही राजीनामा आणि त्यानंतर त्या सॉरी अमरिंदर’ असेही म्हणाल्या.
'I am sorry Amarinder', said Congress President Sonia Gandhi after I spoke with her over my resignation, this morning: Amarinder Singh after resigning as Punjab Chief Minister pic.twitter.com/ESYXKPOHJO
— ANI (@ANI) September 18, 2021
दरम्यान, सिंग यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अनेक नवे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत दाखल झाली आहेत. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय माजी खासदार आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव निश्चित झाले आहे. फक्त एवढेच नाही तर पंजाब सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री पदासाठी चरणजीत सिंग चन्नी, राजकुमार वेरका तसंच सुखजिंदर सिंग रंधावा यांची नावे समोर येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- वेळ गेलेली नाही, अजूनही शिवसेना-भाजपची युती होऊ शकते; आठवलेंना विश्वास
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- बाप्पा चालले गावाला… श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचे विसर्जन उद्या ‘या’ वेळी होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
