मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर आज (३१ जुलै) रोजी छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर आज सकाळपासून संजय राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राऊतांवरील कारवाईवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे.
“लाज लज्जा शरम सोडून निर्लज्जपणाने हे कारस्थान सुरु आहे. हिंदुत्व बोलायचे जेव्हा कोणाचे धाडस होत नव्हते. तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष हिंदुत्वावर बोलत होता. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा हे सगळे कोठे होते,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला केला.
महत्वाच्या बातम्या :
- Girish Mahajan | जर तुम्ही शुद्ध आहात तर शपथ घ्यायची गरज नाही – गिरीश महाजन
- Sanjay Raut ED Inquiry | “संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होतीच” ; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
- Sanjay Gaikwad | “छाती नसताना छाती काढून आव आणायचा…” ; शिंदे गटातील आमदारची संजय राऊतांवर टीका
- मोठी बातमी! पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत ईडीच्या ताब्यात
- Uday Samant | संजय राऊतांच्या चौकशीनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल – उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

