Share

आखिर चल क्या रहा है महाराष्ट्र में? काँग्रेसच्या माजी खासदाराचा राज्य सरकारला घरचा आहेर

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आधीच त्रस्त असलेला महाराष्ट्र, विविध अपघातांमुळे आणखी त्रस्त झाला आहे. भंडारा, नागपूर, मुंबई, नासिक नंतर आता विरारमध्ये अपघातामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यावर काँग्रसचे माजी खासदार विजय दर्डा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरोनापेक्षा जास्त रुग्ण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृत्यू पावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या संदर्भात विजय दर्डा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये विरार मधील हॉस्पिटलच्या अंतर्गत जळालेल्या भागाची दृष्ये आहेत. यावर दर्डा यांनी लिहिले की, ‘महाराष्ट्रात हे काय सुरू आहे आणि इतक्या घटना घडत आहेत? लोक कारोना व्हायरसपेक्षा जास्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृत्यूमुखी पडत आहे, असे कधी पर्यंत चालायचे? आज विरार मधील विजय बल्लभ कोव्हीड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आग लागल्याने १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.’

विजय दर्डा हे काँग्रेसचे माजी खासदार असून महाराष्ट्रातील मोठे उद्योजक आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या घटना सर्वांनाच विचलीत करणाऱ्या आहेत. आता काँग्रेसच्या माजी खासदारानेच महाराष्ट्रातील घटनांवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारला ‘घराचा आहेर’च म्हणावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!