Share

औरंगाबादेत लस न घेतलेल्यांच्या घरी पोहोचले प्रशासक पांडेय..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर दस्तक’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत लस न घेतलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) हे स्वतः लस न घेतलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन पोहोचले.

जगायचे असेल तर लस घ्या. आता आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत, तरी अनेक नागरिक लस घ्यायला तयार नाहीत. प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे, लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी रुग्णाला फारसा त्रास होणार नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरजच पडणार नाही, असे मत मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले. याच्या अंमलबजावणीसाठी ते स्वत: नागरिकांच्या घरी पोहोचले.

मंगळवारी (दि. २८)प्रशासक पाण्डेय यांनी हर्सूल आरोग्य केंद्रा अंतर्गत सारा रिद्धी या परिसरात खाडेकर व इतर कुटुंबियांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांच्या ज्या सदस्यांनी दुसरी लस घेतली नव्हती त्यांना दुसरी लस घेण्यास प्रोत्साहित केले. मीरा नर्सिंग खाडेकर (४४ वर्ष), आरती नर्सिंग खडेकर (२१), मैथिली नाईक (२०), विजय पुंगळे (२१) यांनी यावेळी प्रशासकांसमोर लस घेतली. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आणि आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!