मुंबई: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आरे कारशेडवरून शिंदे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. आम्ही आदिवासी लोकांसाठी आरेमध्ये रस्ते केले नाही. कारण, झाडं तोडळी जाऊ नयेत. आम्ही सरकारमध्ये आरे कारशेड कांजूरमार्गला नेत होतो. त्यामुळे १० हजार कोटी वाचले असते. सरकार आरे तोडण्याची भुमिका का घेत आहे कळत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच आज आरेमधील मेट्रो कारशेड विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचे सांगून आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल. मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी आंदोलनकर्त्यांना दिला.
माजी मंत्री ठाकरे यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधत आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका असा टोलाही लगावला. तसेच यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला स्थगिती सरकार म्हणून डिवचले. तसेच माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- ENG vs IND : दुसऱ्या टी-२० मॅचपूर्वी ‘कॅप्टन कूल’ धोनीनं भारताच्या ‘यंगिस्तान’ला दिल्या टिप्स; पाहा PHOTO!
- Abdul sattar:”शिंदेंकडे येण्यासाठी सर्व जण रांगेत उभे आहेत, पण…”; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट
- ENG vs IND : इंग्लंडच्या लाजिरवाण्या पराभवानंतर वसीम जाफरनं मायकल वॉनला डिवचलं; म्हणाला…
- Amit Shah : मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्लीवारीचा अफेक्ट?; अमित शाहांनी दिल्या मराठीतून एकादशीच्या खास शुभेच्छा
- Tanaji Sawant : शिवसेनेचा तानाजी सावंतांना मोठा धक्का, सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

