🕒 1 min read
Aditya Thackeray | मुंबई : मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घणाघात केला आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा विधान (Mangalprabhat Lodha) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाशी केली होती.
यावेळी, एकीकडे मिंधे गटातील नेत्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाशी करणं चूक आहे. ही तुलना होऊच शकत नाही. हा सगळा महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रयत्न दिसत आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.
तसेच, महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र द्वेष सुरू आहे. शिंदेंची तुलना महाराजांबरोबर करण्याचा हा प्लॅन आहे आणि त्यामध्येच अशा पद्धतीची वक्तव्य येतात, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, प्रतापरगडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा विधान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “मी उपस्थित राहणार नाही…”, संजय राऊतांचा बेळगाव कोर्टाच्या समन्सला उत्तर
- Tukaram Mundhe | दबंग अधिकारी तुकाराम मुंढेंच्या बदल्यांचा इतिहास, कुठे झाल्या बदल्या, बदल्यांचे कारण काय?
- Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केसांना निरोगी आणि दाट बनवण्यासाठी करा आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश
- Sanjay Raut | “उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते…”; संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Mohommad Kaif | Live कॉमेंट्रीमध्ये मोहम्मद कैफने उडवली युजवेंद्र चहलची खिल्ली, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
