औरंगाबाद : महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा’ या विशेष अभियानाअंतर्गत शहरातील अतिशय प्राचीन खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही महिन्यात नदीची साफसफाई, नदीकाठावर वृक्षारोपण, नदीकाठच्या भिंतींना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.७) या कामाचा आढावा घेतला. दर शनिवारी कामासंदर्भात होणार्या बैठकीची लिंक शेअर केल्यास मलाही त्यात सहभागी होण्यास आवडेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मनपाने खाम नदीसाठी १५ कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे, अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत दिली. मागील काही महिन्यांपासून प्रत्येक शनिवारी लोकसहभागातून खाम नदीच्या पात्राची स्वच्छता इत्यादी कामे केली जात आहेत. शुक्रवारी खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात पर्यटनमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्त पांडेय यांनी सांगितले की, हे काम पालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी अभियान, इको सत्व, व्हेरॉक, छावणी परिषद व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे.
नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पालिकेने १५ कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. दरवर्षी निधी उपलब्धतेनुसार टप्प्या-टप्प्याने नदीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम पूर्ण केले जाईल. पाच वर्षात प्रकल्प नावारूपास येईल. ठाकरे यांच्यासह आमदार अंबादास दानवे यांनी या कामाचे कौतुक केले. यावेळी पर्यटमंत्री ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवावा, अशी सूचना केली. तसेच प्रत्येक वेळी खाम नदीतील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले पाहिजे. दर शनिवारी कामासंदर्भात होणार्या बैठकीची लिंक शेअर केल्यास मलाही त्यात सहभागी होण्यास आवडेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच्या ‘या’ महत्त्वपूर्ण योजनेत एमआयएम खा.जलील यांचे विशेष लक्ष!
- सुखद, सकारात्मक! औरंगाबादेत लवकरच शंभर बेड्सचे कोविड बाल रुग्णालय
- ‘तुम्ही फक्त लस पुरवा, २४ तास काम करून लसीकरण मोहीम फत्ते करतो’
- राज्यात लॉकडाऊन वाढणार ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदी, राष्ट्रपतींकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

