मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. आपल्याविरोधात याप्रकरणी लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली आहे. महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे आणि खासदार समीर भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयापुढे अर्ज सादर केला असून लवकरच यावर सुनावणी अपेक्षित आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवत विकास चमणकर यांच्या कुटूंबातील चौघांसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात एसीबीवर बेजबाबदारपणे गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवला आहे.
छगन भुजबळ यांनी सुरूवातीपासूनच महाराष्ट्र सदन प्रकरणात बिनबुडाचे आरोप लावल्याचा दावा केला होता. या प्रकरणातच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी मोठा काळ या कारागृहात घालवला होता. या प्रकरणात छगन भुजबळ यांना जामीन मिळाला. भुजबळ यांच्यासह अन्य चौदाजणांविरोधात दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नुकतीच मुंबई सत्र न्यायालयाने पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यात विकासक चमणकर कुटुंबियातील प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, प्रसन्न चमणकर, कृष्णा चमणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अरूण देवधर यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- कृतज्ञता…कोरोना काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देणार
- देशभरात गेल्या तीन वर्षात एकूण 5,17,322 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
- भाजपमध्ये साईडलाईन झालेले विखे, हर्षवर्धन पाटील यांनी ‘या’ कारणासाठी घेतली अमित शाहांची भेट
- भाजप आमदाराच्या मतदारसंघात शिवसेनेची रणनीती; दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश!
- आंबिल ओढा सरळ झाल्यास पुराचा धोका वाढणार; नागरिकांनी केला विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
