Share

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन गावातच स्विकारा, पालकमंत्र्यांच्या सूचना

Published On: 

लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे सुरूवातीला कमी झालेल्या पावसामुळे व गेल्या आठवड्यात जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे अर्ज ऑनलाईन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी येत असून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची विनंती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने पालकमंत्री देशमुख यांनी ऑनलाईन सोबत ऑफलाईन गावातच तलाठी कार्यालयात अर्ज स्विाकारण्याच्या सुचना जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे केल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनी व प्रशासनाने नुकसानीचे ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे. तथापी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. काही भागात इंटरनेट सुविधाही उपलब्ध नाही. याकरीता शेतकऱ्यांचे ‘ऑफ लाईन अर्ज’ स्विकारावेत अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्या प्रमाणे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे आपले अर्ज गावातील तलाठी कार्यातयात जमा करण्याचे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!