औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये बंद आहेत. ते सुरू करण्यासंदर्भात आपण कधीही जाहिर केलेले नाही. तर नोव्हेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचे मी सांगितले होते. महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातला निर्णय अद्याप झालेला नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. औरंगाबादमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आम्ही सध्या फक्त कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहोत. रुग्ण संख्या किती आहे, किती महाविद्यालयातील वसतीगृहांच्या ठिकाणी कोविड सेंटर आणि क्वॉरंटाइन सेंटर आहेत. याची माहिती घेतली जात आहे. नोव्हेंबरमध्ये परिस्थिती काय असेल याचे सर्वेक्षण करण्यात येईल. सर्व विभागांची माहिती घेवून टास्क फोर्ससोबतच्या चर्चेनंतरच शाळा-महाविद्यालये उघडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती सामंत यांनी दिली.
शाळा-महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात घाई-घाईने निर्णय घेता येणार नाही. सर्व परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. याचा मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व गांभीर्याने विचारत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये महाविद्याल उघडणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या रूटच्या सर्व लाईन व्यस्त आहेत…औरंगाबादेत अग्निशमन विभाग ‘ऑन कॉल’!
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

