Share

अबब! लातूरकरांनी थकविले पाणीपट्टीचे ६३ कोटी

Published On: 

लातूर:  शहर महापालिकेच्या हद्दीतील व हद्दीबाहेरील नळधारकांकडे मार्च २०२१ अखेर ६३ कोटी रुपये पाणीपट्टी थकित आहेत. २०२०-२१ या वर्षात अवघी ७ कोटी ७२ लाख रुपये वसुली झाली आहे. पाणीपुरवठ्यावर महापालिका जेवढा खर्च करते, तेवढा खर्चही वसूल न झालेला नाही. मनपा आयुक्त अमन मित्तल हे लातूरकरांना दररोज अथवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात आहेत. त्यामुळे थकित पाणीपट्टीबद्दल ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

लातूर शहराला मांजरा धरणासह नागझरी व साई बंधाऱ्यावरील योजनांद्वारे ११ जलकुंभंतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांपासून अंतर्गत वितरण व्यवस्था सक्षम नसल्यामुळे सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मार्च २०१० पासून ते मार्च २०२० पर्यंत शहरातील ५५ हजार ९९६ नळधारकांकडे ६० कोटी ९१ लाख ५२ हजार ४१७ रुपये थकित आहेत. तर २०२०-२१ या वर्षाची पाणीपट्टी मागणी १० कोटी ५४ लाख २५ हजार ३२८ रुपये होती.

अशी एकूण ७१ कोटी ४५ लाख ७७ हजार ७४५ रुपये वसूल करण्यासाठी मार्च २०२० पासून जलकुंभनिहाय पथके तयार करुन वसुली करण्यात आली. त्यामध्ये मागील बाकीतील ६ कोटी १४ लाख ९६ हजार ३९९ रुपये वसूल झाले, तर २०२०-२१ या वर्षातील १ कोटी ५७ लाख ६८ हजार १७६ रुपये पाणीपट्टी वसूल झशली. म्हणजे, आणखी ६३ कोटी ७३ लाख १३ हजार १७० वसूल होणे बाकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!