Share

अबब! एकाच कसोटी सामन्यात १३०० धावा

Published On: 

कँडी : भारतात सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशचा संघ हा श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ दोन कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. यातील पहिला कसोटी सामना हा अनिर्णीत झाला होता. या कसोटी सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत ७ गडी गमावत ५४१ धावांवर डाव घोषित केला होता. तर दुसऱ्या डावात २ गडी बाद १०० धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेच्या संघाला या सामन्यात एकदाच फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. या श्रीलंकेच्या संघाने ८ बाद ६४८ धावा करत डाव घोषित केला होता.

या सामन्यात ७५.८२ च्या सरासरीने तब्बल १२८९ धावा झाल्या होत्या. तर केवळ १७ गडी बाद झाले होते. त्यामुळे या खेळपट्टीवर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सामनाधिकारी रंजन मदुगले या खेळपट्टीबाबत बोलतांना म्हणाले, ‘ ही खेळपट्टी पूर्ण सामन्यात फलंदाजीसाठी अनुकूल होती.’ त्यामुळे आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या खेळपट्टीवर सामना झाला त्या खेळपट्टीला सरासरीने खराब रेटिंग देण्यात आले.

आयसीसीच्या नियमानुसार सरासरीपेक्षा खाली रेटिंग असलेल्या खेळपट्टीला एक डीमेरिट अंक, तर खराब आणि अनफिट खेळपट्ट्या असलेल्या जागेला अनुक्रमे तीन आणि पाच डीमेरिट गुण दिले जातात. हे डीमेरीट गुण ५ वर्षापर्यंत लागु असतात. या नियमानुसार जर एखाद्या खेळपट्टीला ५ किंवा त्यापेक्षा जास्त डीमेरीट गुण दिले तर स्टेडियमवर १२ महिने आंतरराष्ट्रीय सामने आयोजन करण्यावर बंदी घालण्यात येते. जर १० डीमेरीट गुण झाले तर त्या स्टेडियमवर २४ महिने आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यावर बंदी घालण्यात येते.

महच्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!