Share

मेट्रोच्या सुखाच्या प्रवासापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा,मनमौजी राजपुत्र करत आहेत

Published On: 

मुंबई- कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. भाजपनेते आ. आशिष शेलार यांनी देखील या निर्णयावर टीकास्त्र सोडले. अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र यांच्यामुळे राज्याची अवस्था काय होते, अशा अनेक दंतकथा आपण ऐकल्या आहेतच. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र करत आहेत.

आशिष शेलार म्हणाले, मेट्रो कार शेड कांजुरला करण्याचा निर्णय घोषित झाला आहे त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे. त्याचा डीपीआर झालाय आहे का? त्याचा टेक्निकल स्टडी झाला आहे का? त्याचा ऑपरेशनल प्लॅन तयार झाला आहे का? या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचं आणि जनतेला भ्रमित करायचे असे चित्र कालच्या मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह मुळे जनतेमध्ये निर्माण झाले आहे.

शून्य पैशांमध्ये जागा ही केवळ घोषणा आहे. कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणते आहे, ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारने आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होते असंआशिष शेलार म्हणाले.

मिठागरांचा जागांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे गेल्या पंधरा वर्षात झालेले मंत्रिमंडळाचे गट, त्यातून मीठागरांची जागा कशी वापरावी याबाबतचा कोणताही निर्णय झाल्याचे ज्ञात नाही. तरीही एकांगीपणे राज्य सरकारने हा निर्णय घेतला याचा अर्थ राज्य सरकारच्या मनात छुपा डाव तर नाही ना? मिठागरांचा जागांवर अधिकार सांगणाऱ्या काही खाजगी मालकांना मेट्रोच्या निमित्ताने या जागा खुल्या करून देण्याचा हा राज्य सरकारचा डाव तर नाही ना? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

आज ज्या पद्धतीचे मेट्रो 3 च्या बोगद्याचे काम सुरू आहे, ते ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे. तर मग आता त्यामध्ये बदल आपण करणार असू तर एलिव्हेटेड काम नेमके कुठे होणार? याबाबत जाणकार असे सांगत आहे की, एलिव्हेटेड भाग सुद्धा आरे मध्ये येऊ शकतो. राज्य सरकारने हा निर्णय घेताना कोणताही अभ्यास केलेला नाही, कुठलाही अभ्यास गट स्थापन केलेला नाही, डीपीआर केलेला नाही, आरेच्या जागेतून जर एलिव्हेटेड मार्ग जाणार असेल तर मग अजून आरेतील किती झाडे तोडली जाणार आहेत? तसेच आरे मधील जी जागा मोकळी झाली आहे यावर कारशेडचे 30 टक्के काम झाले आहे, ती जागा अन्य कामासाठी वापरण्याचा सरकारचा कुहेतू तर नाही ना? असा सवाल उपस्थित त्यांनी केले आहेत.

पुढे बोलताना शेलार म्हणाले, एक नवीन टेंडर राज्य सरकारला आपल्या काळामध्ये काढायला मिळावे हा हेतू या सरकारचा आहे, अशी चर्चा सुध्दा आहे.जर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते हे तर सोळा लाख मुंबईकरांना पुढील सहा महिन्यात मेट्रोचे काम पूर्ण होऊन कारशेडचे काम पूर्ण होऊन, प्रवासाची संधी उपलब्ध झाली असती, मात्र कारशेड च्या निर्णयाने जनतेची गैरसोय करण्याचे काम हे राज्य सरकार करते आहे. मुख्यमंत्र्यांनी अहंकारापोटी आणि मनमौजी राजपूत्रांनी ही मुंबईकरांची गैरसोय करण्याचे काम केले आहे.याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा का केली नाही? यामध्ये जनता भरडली जाणार आहे, यामध्ये सरकारचा हेतू काय आहे ? त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी काही खुलासे जनतेसमोर करण्याची गरज आहे असं शेलार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!