Share

“आपलं मुंबई शहर उद्ध्वस्त होतंय, आपण आपल्या घरातच मरतोय, याला जबाबदार कोण?”, अमृता फडणवीसांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबईतील ताडदेव भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून येथील एका इमारतीत अग्नी तांडव बघायला मिळाला आहे. ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आज(२२ जाने.)सकाळी भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी संताप व्यक्त केला आहे.

“आपलं मुंबई शहर समोर उद्ध्वस्त होत आहे. (आगीचा व्हिडिओ पोस्ट केला असून )सरकारी इस्पितळात सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्येच मरतोय, खड्डे आणि अनागोंदीने भरलेल्या रस्त्यांवर रस्ते अपघातात आपण मरतोय, याला कोण जबाबदार आहे?” असा सवाल करणारे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, ही आग नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला लागली असून या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत, तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे . तसेच अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर बाकी जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असल्याचे बघायला मिळत असून ही आग कशी लागली यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!