🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. सरकारला शेतकरी आत्महत्येचं काही देणेघेणे नसून ते विजयाच्या जल्लोषात दंग आहे.भाजप सरकार, शेतकऱ्यांच्याच जीवावर उठले आहे. अशी टीका महाराष्ट्र कॉंग्रेसने त्यांचा ट्विटर अकाऊंट वरून केली आहे. भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला, त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा ३० तारखेला शपथविधी झाला. शपथविधी झाल्यानंतर दोन दिवसांमध्ये विरोधकांनी टीका करणे सुरु केले आहे.
भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी आत्महत्या वाढतचं असून राज्यात दररोज सरासरी ५ शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला मात्र याच्याशी काही देणेघेणे नसून ते विजयाच्या जल्लोषात दंग झाले आहेत. अशी टीका महाराष्ट्र कॉंग्रेसने त्यांचा ट्विटर अकाऊंट वरून केली आहे. इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांना आश्वासनं देऊन निवडून आलेलं भाजप सरकार, शेतकऱ्यांच्याचं जीवावर उठले आहे. अशी टीकाही त्यामध्ये करण्यात आली आहे.
भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी आत्महत्या वाढतच असून राज्यात दररोज सरासरी ५ शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला मात्र याच्याशी काही देणेघेणे नसून ते विजयाच्या जल्लोषात दंग आहे. शेतकऱ्यांना आश्वासनं देऊन निवडून आलेलं भाजप सरकार, शेतकऱ्यांच्याच जीवावर उठले आहे! pic.twitter.com/sNYdb9laHy
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 1, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
