मुंबई : राज्यासह देशात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
यासोबतच, विरोधी पक्षासह महाविकास आघाडीतील नेते देखील आता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागाच्या बैठकांना गेल्या काही दिवसांपासून वेग आला आहे. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांविना पास केलं जाणार असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या बोर्डाच्या परीक्षांचे काय होणार ? असा सवाल आता समोर उभा राहिला आहे.
दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरु आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.
कोरोना रुग्णसंख्या पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात, असं मत बैठकीत मांडण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडून अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाभारत मध्ये ‘देवराज इंद्र’ची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- …तर माझे नाव बदला, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार प्रहार
- मोठी बातमी : राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत…


