टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. या संवाद दौऱ्यात नाशिक येथे बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.
नाशिक येथे बोलताना सुप्रिया सुळे यांनी ‘मी परवा मुख्यमंत्र्यांना विचारलं, तुम्ही आमच्यावर आरोप करता, पण तोच माणूस तुमच्याकडे आला तर साफसुथरा आणि चांगला होतो. अशी कसली वॉशिंग पावडर तुमच्याकडे आहे की, धुवून माणूस साफ होतो. त्याचं उत्तर त्यांनी काल दिल. ते म्हणाले सुप्रिया सुळे, आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही, आमच्याकडे डॅशिंग रसायन आहे असं विधान केले.
पुढे बोलताना सुळे यांनी ‘मी सायन्स स्टुंडट आहे. सगळीच रसायनं चांगली नसतात. आजकाल शेतकरी पण रसायनं नको, कीटकनाशकं नको म्हणतात. महिला रसायनं असलेल्या भाज्या नको म्हणतात. त्यामुळे तुम्हाला यांच्या रसायनाचा विकास हवाय की आम्ही केलेला विकास पाहिजे, याचा विचार करायची वेळ आली आहे असं विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
दरम्यान, बीड येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱ्यावर टीका केली आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांनी सत्ता असताना जनतेशी संवाद साधला असता, तर ही वेळ आली नसती, असा टोला सुळे यांच्या संवाद दौऱ्याला लगावला आहे.
- महादेव जानकरांचा घुमजाव; संजय दत्त ‘रासप’साठी निभावणार ‘ही’ भूमिका
- ‘भगव्या रंगावर कुणाची मक्तेदारी नाही, मग आम्ही वापरला त्यात गैर काय’
-
भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या…
- दिपाली सय्यद यांनी पुण्यातून विधानसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
