टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाचा अजेंडा व आश्वासन काँग्रेसचेच असल्याचे भाष्य केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याकरिता राणे समिती डिसेंबर २०१२ ला स्थापन केली होती. असे सचिन सावंत यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर समिती स्थापन झाल्यानंतर समितीने अहवाल दिल्यानंतर २०१४ जूलै महिन्यात अध्यादेश काढला होता, असेही सावंत यांनी म्हंटले.
याचबरोबर अध्यादेश काढेपर्यंत भाजपा किंवा शिवसेनेने कधीच मराठा आरक्षणाची मागणी केली नव्हती. त्यामुळे हा अजेंडा आणि आश्वासन काँग्रेसचेच होते, असे सचिन सावंत यांनी म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
