Share

‘आता आणखी किती “बंद”???’; केदार शिंदेंची ठाकरे सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद येत आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारच्या या बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे. तसेच अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही बंदला निषेध करत सरकारवर टीका केली आहे.

केदार शिंदे यांनी ट्विट करत लिहिले की, ‘निषेधाचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. “बंद” हा एकच पर्याय नाही. या दिड वर्षात जनता हवालदिल झाली आहे. काळजीपोटी सरकारने या आधी बऱ्याच गोष्टी बंद ठेवल्या होत्या- आहेत. आता आणखी किती “बंद”??? नका अंत पाहू.’ लॉकडाऊन मुळे आधीच लोकांचे हाल झाले असताना आता सर्व पूर्वपदावर येत असताना हा बंद करण योग्य नसल्याचे केदार शिंदेने म्हंटले आहे.

दरम्यान, आज अत्यावश्यक सेवा वगळता सर्व  दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.  तरीही अनेक व्यापाऱ्यांनी आज दुकाने चालू ठेवली होती. मात्र यावेळी काही कार्यकर्त्यांनी वाद घालत दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. तर सोलापूर,बीडमधील काही कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे चित्र देखील दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!