🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. असे असतांनाच शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनणार नाही, म्हणून लोक आपल्या भाषणांमध्ये हमखास त्यांचे नाव घेतात, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले की,‘पवार साहेबांमुळेच महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. त्यामुळे पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय बातम्यांमध्ये हेडलाईन होत नाही म्हणून लोक हमखास आपल्या भाषणांमध्ये पवार साहेबांचे नाव घेतात,’ असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य कोणीही करू नये. दोन वर्षांच्या कोरोना प्रादुर्भावानंतर लोकं पुन्हा कामाला लागले आहेत. एकतर लोकांच्या खिशामध्ये पैसे नाहीत. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, भाज्या, केरोसिन व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दर महागले आहेत. मात्र यावर कुणीच बोलताना का दिसत नाही?’, असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “भाजपाचा आदेश जसाच्या तसा मानला…”; सचिन सावंतांचा राज ठाकरेंना टोला
- “मतांची पोळी भाजून घेण्यासाठी…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
- “पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही”- संजय राऊत
- IPL 2022 : टाटा, बाय-बाय, खतम..! आकाश चोप्राच्या ट्वीटला चहलनं दिलेलं ‘उत्तर’ वाचून तुम्हीही हेच म्हणाल!
- ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ म्हणत बाळासाहेब थोरातांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
