🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही विधाने समोर आली आह. याच वादग्रस्त विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर आरोप केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप (BJP) नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा मुद्दा तापलेला असताना याचा विसर पाडण्यासाठी भाजपने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा विषय समोर आणल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
ते म्हणाले, “तुमच्या मनात शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम आणि काय भावना हे दिसून येत आहे.” भाजपचा डीएनए चेक करायला पाहिजे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अवमान असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा मुद्दा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल झालेला अपमानाची तीव्र भावना कमी करण्यासाठीच भाजपने ही भूमिका घेतल्याचं संजय राऊत म्हंटले आहेत. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल तर त्याविषयी आम्ही आक्रमक होणारच असेही संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gujarat Election Results 2022 | गुजरात निकालांवर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले…
- SSC Ricruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Ravi Rana | “महाराष्ट्रात सुद्धा भाजप सत्तेत येईल” ; रवी राणा यांचा विश्वास
- Nana Patole | “गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही”; नाना पटोले असं का म्हणाले?
- Skin Care Tips | ‘या’ पद्धतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास मिळू शकतात अनेक फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
