Share

Shivsena | “बाळासाहेबांनी नारायण राणे यांना अक्षरश: हाकलून दिलं होतं”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर शिवसेना नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांना ’50 खोके’, ‘गद्दार’ असं संबोधलं जात आहे. याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप पक्षाचे नेते नारायण राणेही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शिंदे गटाने गद्दारी केली नाही तर, उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना आमदार आणि पक्षाशी खरी गद्दारी केली आहे. त्यांनी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. यावर शिवसेना पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवाजीराव चोथे यांचा नारायण राणेंवर हल्ला-

बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना अक्षरश: हाकलून दिलं होतं. त्यामुळे नारायण राणें यांनी गद्दाराची भाषा करू नये, असं शिवाजीराव म्हणाले आहेत. मातोश्रीच्या जीवावर मोठं झालेल्या राणेसारख्या लोकांनी म्याव म्याव करण्याची आवश्यकता नसल्याचंंही चोथे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे बछडा-

तसेच, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक हे वाघ आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे सारख्या वाघाचा बछडा असल्याचंही शिवाजीराव चोथे यांनी म्हटलं आहे.

पुढे शिवाजीराव चोथे असंही म्हणाले की, नारायण राणे आणि मी 1995 साली एका सरकारमध्ये होतो. ते एक मंत्री होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री कसे झाले? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी कुणाशी गद्दारी केली? हे राणेसारख्या माणसानं महाराष्ट्रातील जनतेला शिकवू नये.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!