🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. आमदार आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच त्यांनी पहिला डाव शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात टाकला आहे. भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेची डोकेदुखी वाढवली आहे.
गड कुणाचा? कोणी ठरवलं? गड ठरवणं हे शेलार मामाशिवाय कोण ठरवू शकते? आदित्य ठाकरे हे युतीत निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही गड मानत नाही. आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दाखवून भाजपच्या मतांवर निवडून आले आहेत. मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेसाठी पवारांच्या गोदीत बसायचे ही लाचारी नाही का? असा परखड सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना केला.
महत्वाच्या बातम्या :
- Monsoon Session | “50 खोके एकदम ओके!, आले रे आले गद्दार आले…” ; विरोधकांची घोषणाबाजी, धनंजय मुंडे जोशात
- Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला होणार अटक?; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
- Amol Mitkari । मोहित कंबोज हे कोणाच्या चड्डीचा नाडा आहेत हे सर्वांना माहिती आहे; अमोल मिटकरींचा खोचक टोला
- NCP vs Mohit kamboj | “नादाला लागल्यावर आम्ही नांगरासकट बैल लावतो”; राष्ट्रवादीच्या नेत्याचा कंबोज यांना इशारा
- Aditya Thackeray | मोहित कंबोज यांच्या ट्विटवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल म्हणाले, “लोकशाही आहे…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
