🕒 1 min read
सांगली : महाराष्ट्राच्या राजकीय संकटात चेक अँड मॅचचा खेळ सुरूच आहे. एकीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची गटबाजी मजबूत होत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंपासून एक-एक करून आमदार वेगळे होताना दिसत आहेत. असे असतानाही शिवसेना प्रबळ असल्याचा दावा करत आहे. शिवसेनेकडून आतापर्यंत 16 बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारे पत्र उपसभापतींना पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे शिंदे स्वतःला विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणवत आहेत. काल झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत पक्षाचे केवळ १३ आमदार पोहोचले होते. महाराष्ट्रात त्यांचे 55 आमदार आहेत. म्हणजेच उर्वरित ४२ आमदार शिंदे गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील ३८ आमदार सध्या शिंदे यांच्या जवळ गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. या सर्व राजकीय राड्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेले नाही हे स्पष्ट होत. भाजप पाशवी वृत्ती दाखवून सरकार हस्तगत करत आहे. भाजपकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं जात आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. भाजपकडे ईडी, सी.बी.आय. इनकम टॅक्स हे तीन कार्यकर्ते आहेत आणि यांच्या माध्यमातूनच या सगळ्या उलथा पालथी होतात. हे स्पष्ट आहे.”
शिवसेनेने अपात्रतेचे पत्र आणि याचिका विधानसभेच्या उपसभापती कार्यालयाला दिली आहे. यापूर्वी काल १२ आमदारांवर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले होते. आता एकूण १६ बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे पत्र उपसभापतींना देण्यात आले आहे. शिवसेनेची कायदेशीर टीम विधानभवनात पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
