🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ५६व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला कोलकाता नाइट रायडर्सकडून (MI vs KKR) ५२ धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबईचा ११ सामन्यांतील हा ९वा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने ५ वेळच्या चॅम्पियन मुंबईला १६६ धावांचे लक्ष्य दिले होते, पण प्रत्युत्तरात मुंबई १७.३ षटकांत ११३ धावांवर गारद झाली. या लाजिरवाण्या पराभवासाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजांना जबाबदार धरले.
पॅट कमिन्स (२२ धावांत ३ बळी), आंद्रे रसेल (२२ धावांत २ बळी) आणि टिम साऊदी (१० धावांत एक बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा इशान किशन (५१) एकटाच उभा राहू शकला. मुंबईच्या जसप्रीत बुमराहने (१० धावांत ५ बळी) कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली, पण त्यानंतर फलंदाजांना आपली जबाबदारी पार पाडता आली नाही.
That's that from Match 56.@KKRiders take this home comfortably with a 52-run win over #MumbaiIndians
Scorecard – https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/3gu0ZsHYH6
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
मुंबईच्या कर्णधाराने सामन्यानंतर सांगितले, ”अशा खेळपट्टीवर आम्ही कोणत्याही दिवशी विरोधी संघाची ही धावसंख्या स्वीकारली असती. डावाच्या उत्तरार्धात गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. बुमराहने अप्रतिम कामगिरी केली. मी फलंदाजीबाबत निराश झालो आहे. मला वाटते की या खेळपट्टीवर ही स्पर्धात्मक धावसंख्या होती, परंतु आम्ही फलंदाजीत खराब कामगिरी केली. आम्ही आमचा चौथा सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळत होतो. खेळपट्टी कशी वागते हे आम्हाला माहीत होते. काही चेंडू खूप वेगाने उडी मारतात पण ते घडते. आम्ही आज चांगली फलंदाजी केली नाही, आम्ही भागीदारी केली नाही आणि आज आम्ही चुकलो.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
